शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

‘म्हैसाळ’च्या पाणी वापर संस्थांसाठी न्यायालयात : अजितराव घोरपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:51 IST

सांगली : म्हैसाळ योजने चे पाणी जानेवारीमध्ये अपेक्षित असताना व शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झाल्यानंतर अखेर पाणी सोडण्यात आले, याबद्दल शासनाचे आभारच मानायला हवेत. मात्र, योजना सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाणी वापर संस्थांच्या मागणीवर चालढकल सुरू असून, या प्रश्नावर आता उच्च न्यायालया त याचिका दाखल करणार असल्याचा इशारा माजी मंत्री ...

ठळक मुद्देश्रेयासाठी पाणी लांबत असेल, तर अ‍ॅडव्हान्समध्ये नारळ फोडून घ्या

सांगली : म्हैसाळ योजनेचे पाणी जानेवारीमध्ये अपेक्षित असताना व शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झाल्यानंतर अखेर पाणी सोडण्यात आले, याबद्दल शासनाचे आभारच मानायला हवेत. मात्र, योजना सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाणी वापर संस्थांच्या मागणीवर चालढकल सुरू असून, या प्रश्नावर आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी गुरूवारी पत्रकार बैठकीत दिला.

दरम्यान, पाण्याचे श्रेय घेण्यासाठीच जर पाणी लांबविले असेल, तर अ‍ॅडव्हान्समध्ये नारळ फोडून घ्या. मात्र, शेतकºयांच्या भावनेशी खेळू नका, असे आवाहनही त्यांनी केले.घोरपडे म्हणाले की, १८ हजार कोटी रूपये खर्च झालेल्या म्हैसाळ योजनेचे काम पूर्ण झाले, तर सहा लाखांवर हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. बेरोजगारीचे प्रमाण ल क्षात घेता, पाण्यामुळे युवकांना चांगला रोजगार उपलब्ध होणार असताना, केवळ योग्य नियोजन केले नसल्याने आवर्तन लांबवून शेतकºयांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान केले आहे.

म्हैसाळ योजना चांगल्या पध्दतीने चालू ठेवायची असल्यास पाणी वापर संस्था स्थापन करणे आवश्यक आहे. मात्र, कारण नसताना पाणी वापर संस्था स्थापण्याची प्रक्रिया थांबविण्यात येत आहे. या संस्थांच्या माध्यमातून शेतकºयांना सहभागी करून घेतल्यास नियोजन सोपे होणार असल्याने, आता पाणी वापर संस्था स्थापन कराव्यात यासाठी न्यायालयात दाद मागणार आहोत.

पाणी वापर संस्थांच्या बांधणीसाठी राजकीय डावपेचातून अधिकाºयांकडून चालढकल सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणताही पर्याय निर्माण करा, मात्र पाण्याचे नियोजन करा, हीच आमची भूमिका असताना, यात राजकारण आणणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी फळ मार्केटचे सभापती दीपक शिंदे, भारत डुबुले, जीवन पाटील, आबासाहेब पाटील, शंकरराव गायकवाड आदी उपस्थित होते.श्रेय घ्या, पण शेतकऱ्याला पाणी द्याघोरपडे म्हणाले की, म्हैसाळ योजनेची संपूर्ण उभारणीच आपल्यासमोर झाल्याने व म्हैसाळपासून ते जतपर्यंत समोर उभे राहून कालव्यांची कामे करून घेतल्याने, मला कोणत्याही श्रेयाची गरज नाही. केवळ पाण्याचे श्रेय  घेण्यासाठी म्हणून जर पाणी लांबविले जात असेल, तर हे चुकीचे असून शेतकºयांच्या भवितव्याशी खेळले जात आहे. पाण्याचे श्रेय कुणीही घ्यावे, मात्र या भागाला पाणी द्यावे.म्हैसाळ योजनेला केंद्र सरकारच्या योजनेतून निधी मिळत आहे ही गोष्ट स्वागतार्ह असली तरी, योजनेच्या प्रशासनाकडून चालू असलेले नियोजन पाहता वर्षभरात योजना पूर्ण होईल, असे वाटत नाही, असेही घोरपडे म्हणाले.

टॅग्स :water transportजलवाहतूकSangliसांगली